जेव्हा मुख्यमंत्री आपला ताफा अचानक थांबवून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतात

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात घोडाझरी कालवा पाहणी करून निघालेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला ताफा थांबवत शेतकरी-प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे गाडी थांबवून खाली उतरले आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. 15 वर्ष झाली तरी शेतीला पाणी मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.

नागपूर दौऱ्यात गोसीखुर्द धरणाच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घोडाझरी शाखा कालवा येथे भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफा काही अंतरावरील हेलिपॅडकडे जाण्यासाठी निघाला. तेवढ्यात शेतकऱ्यांचा घोळका हातात कागद घेऊन थांबला असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले, त्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी वाहने थांबविण्याचे आदेश दिले आणि ते स्वत: झटकन गाडीतून उतरून जमलेल्या शेतकऱ्यांकडे गेले.

यावेळी शेतकऱ्यांनी 15 वर्षांपासून गोसीखुर्द धरणातील पाण्याचा एकही थेंब चंद्रपूरमधील शेतकऱ्यांना न मिळाल्याने काहीच फायदा मिळत नसल्याची व्यथा मांडली, मोबदला मिळाला नाही, अशी तक्रारही त्यांनी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी आस्थेवाईकपणे सर्वांशी बोलून आणि त्यांच्या व्यथा जाणून घेऊन यावर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात येतील, असे सांगितले. मुख्यमंत्री स्वत: थांबून आपले म्हणणे ऐकून घेत आहेत, यावर शेतकऱ्यांनी त्यांचे मनापासून आभारही मानले.

महत्वाच्या बातम्या : –

शेतकऱ्यांशी बैठक ‘निष्फळ’ ठरल्यानंतर राहुल गांधी संतापले

लस घेतलेल्यांची अशी पटणार ओळख, राजेश टोपेंनी दिली माहिती

नैसर्गिक खत आणि सेंद्रीय शेती साठी वापरा गांडूळ खत

कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च केंद्राने करावा, राज्य सरकारची मागणी

जाणून घ्या ‘मेवाती गायांची’ माहिती आणि त्या कुठे सापडल्या जातात

Leave a comment