शेतात औषध फवारणीचे नियम काय ? एकदा नक्की वाचा तुम्हला देखील होणार यांचा फायदा
1) मोकळ्या जमिनीवर तणनाशक फवारणी साठी एकरी 15 पंप लागतात .म्हणजे 225 लिटर पाणी लागते.
2)उभ्या पिकात फवारणी साठी प्रति एकर 200 लिटर पाणी लागते म्हणजे 13 पंप लागतात.. (कोणत्याही तणनाशकाचा उत्तम रिझल्ट मिळण्यासाठी उभ्या पिकात औषध मारताना तणांची स्टेज 2-4 पानाची स्टेज असावी.औषध त्या दृष्टीने औषध तयार केलेले असते..प्रति एकर 200 लिटर पाणी वापरल्याने सर्व एरिया कव्हर होतो.)
कोणतेही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक किंवा तणनाशक चे प्रमाण प्रति एकर असते. एक पंप चे प्रमाण नसते..
3) तण उगवू नये यासाठी तणनाशक वापरताना देखील प्रति एकर 13 पंप लागतात..
4) ड्रीप ने खत किंवा औषध सोडताना प्रति एकर 200लिटर पाण्यात सोडावे..
5)आळवणी करताना प्रति एकर 400 ते 500लिटर पाणी पाणी लागते.
6) फवारनी साठी पाणी घेताना पाण्याच्या पी एच 5 च्या आत व 7 च्या पुढे असल्यास असे पाणी फवारणी साठी वापरू नये. 6 ते 6.5 पी च चे पाणी फवारणी साठी उत्तम असते.
पीएच म्हणजे काय हे बर्याच शेतकऱ्यांना माहीत नाही आहे?
फवारणीपूर्वी आपण वापरत असलेल्या पाण्याचा पीएच माहीत करून घेणे आवश्यक आहे. पाण्याचा पीएच हा नेहमी १ ते १४ या अंकापर्यंत मोजला जातो. पाण्याचा पीएच तपासण्यासाठी लिटमस पेपरचा वापर केला जातो. मात्र त्यामुळे पाण्याचा नक्की सामू समजत नाही. बाजारात डिजीटल पीएच मीटर उपलब्ध अाहे. त्याचा वापर केल्यास नेमका पीएच कळतो.
– पाण्याचा पीएच त्यातील धन भार किंवा ऋण भारीत आयनांच्या प्रमाणावरून ठरतो.
– ज्या पाण्यामध्ये धन भाराचे प्रमाण अधिक असते ते पाणी आम्लधर्मीय असते. १ ते ७ अंकापर्यंतचा पीएच हा आम्लधर्मीय असतो.
– ज्या पाण्यात ऋण आयनांचे प्रमाण अधिक असते, ते पाणी अल्कधर्मीय असते. ७ पासून पुढे १४ पर्यंतचा पीएच हा अल्कधर्मीय समजतात.
– ७ अंक दर्शविणारा पीएच हा उदासीन समजतात.
– दोन अंकांमधील पीएच १० पट जास्त असतो. यावरून आपणास पीएचची तीव्रता समजून येईल.
फवारणीवेळी याकडे लक्ष द्या
– फवारणीसाठी पाण्याचा सामू हा ५ ते ६.५ या दरम्यान असावा. पाण्याचा सामू योग्य पातळीपर्यंत कमी करण्यासाठी सायट्रिक ॲसिड किंवा लिंबाच्या रसाचा वापर करतात. मात्र पाण्याचा पीएच स्थिर अधिक काळ ठेवू शकत नाही. अधिक स्थिरतेसाठी सध्या बाजारातील काही द्रावणे उपयुक्त ठरू शकतात. परिणामी फवारणीतील घटक दीर्घकाळ व पूर्ण क्षमतेने क्रियाशील राहून, योग्य तो परिणाम मिळतो.
– द्रावणाचा पीएच नियंत्रित करण्यासाठी फार खर्च येत नाही. कारण पीएच नियंत्रक घटकांचे प्रति १०० लिटरसाठी प्रमाण ३० ते ४० मिलिपर्यंत असते. तुलनेने फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांची किंमत अधिक असते. क्रियाशीलता कमी झाल्याने अपेक्षित परिणाम न मिळाल्यास अधिक नुकसान होऊ शकते, हे लक्षात ठेवावे.
– फवारणी सकाळी किंवा दुपारनंतर केल्यास याचा जास्त फायदा होतो. सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण कमी असते. तसेच या वेळी पानावरील छिद्रे (स्टोमॅटा) जास्त प्रमाणात उघडलेली असतात. त्याद्वारे फवारणीचे द्रावण जास्त प्रमाणात शोषले जाते.
तणनाशकाची फवारणीवेळी
बहुतेक तणनाशके ही विम्लधर्मीय (अल्कलाइन) असतात. त्याच वेळी पाण्याचा सामूही विम्लधर्मीय असल्यास तणनाशकाची अर्धी कार्यक्षमता लवकर संपते. त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाही. अशा वेळी तणनाशकालाच दोष दिला जातो.
महत्वाच्या बातम्या : –
नियमित आंबा मोहरासाठी पॅक्लोब्युट्रॉझॉल
नोकरीच्या मागे न लागत ‘या’ शेतकऱ्याने निवडला शेतीचा पर्याय, केली पिवळ्या रंगाच्या कलिंगडाची लागवड
कोकणात एका प्रगतशील शेतकऱ्याने केले चक्क लाल भेंडीचे संशोधन
शिंगाड्याचे औषधी उपयोग तुम्हाला माहित आहे काय ?
करडांना होणारे सर्वसाधारण आजार, लक्षणे व त्यावरील उपाय