शेतकऱ्यांची बाजू घेतल्याचा आव आणून सुप्रीम कोर्टाने शेतकऱ्यांचा मोठा अपेक्षा भंग केला – राजू शेट्टी
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना तात्पुरती स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला मोठा दणका दिला आहे. कायद्यांना स्थगिती देण्यासोबतच न्यायालयाने 4 सदस्यीय समिती नेमली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पटला नसून, त्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. या कायद्याचे समर्थन करणाऱ्या सदस्यांची समिती नेमली असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला आहे.
राजू शेट्टी ट्विट करत म्हणाले की, न्यायालयाने शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग केला आहे. कायद्यांना स्थगिती देऊ, आंदोलन मागे घ्या. कायद्यांचं समर्थन करणाऱ्या सदस्यांची समिती नेमलेली आहे.
समिती अदानी व अंबानींना सोयिस्कर होईल असा रिपोर्ट देतील, तो कायद्याच्या स्वरुपात तुमच्या बोकांडी बसवतो असंच कदाचित सुप्रीम कोर्टाला म्हणायाचे असेल, असे म्हणत राजू शेट्टींनी न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.
कोर्टाने शेतकर्यांचा अपेक्षा भंग केला. कायद्यांना स्थगिती देऊ, आंदोलन मागे घ्या कायद्यांचं समर्थन करणाऱ्या सदस्यांची समिती नेमलेली आहे. ते अदानी व अंबानींना सोयिस्कर होईल असा रिपोर्ट देतील, तो कायद्याच्या स्वरूपात तुमच्या बोकांडी बसवतो असंच कदाचित सुप्रिम कोर्टाला, म्हणायचे असेल.
— Raju Shetti (@rajushetti) January 12, 2021
दरम्यान, नव्या कृषी कायद्यांना न्यायालयाने स्थगिती देण्याचा निर्णय दिला. पण यावेळी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी चार सदस्यीय समितीचीही स्थापना केली आहे. या समितीला दोन महिन्यांत आपला अहवाल द्यावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या : –
न्यायालयाने शेतकरी कायद्यांना स्थगिती दिली असली तरी लढाई अजून संपलेली नाही – सतेज पाटील
शेतकऱ्यांना दिलासा; कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
राज्यात हायअॅलर्ट लवकरात लवकर घोषित करणं गरजेचं – राजेश टोपे