देवेंद्र फडणवीस यांनी बर्ड फ्लू बाबत व्यक्त केली चिंता
बर्ड फ्लूचं संकट मोठं आहे. या साथीला रोखायच असेल तर वेळीच खबरदरादी घ्यावी लागेल. मोठ्या प्रमाणात कारवाई करावी लागेल, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
बालकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना आजून कोणतीही मदत मिळाली नाही. अजून ऑडिटही झालेलं नाही, असं म्हणत हे सरकार अतिशय टोलवाटोलवी करणारं असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
केंद्र सरकारने आरोग्य सेवेच्या बाबतीत माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्याप्रमाणे काम करण्याचा सल्ला आजच्या सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. त्यावर बोलताना या विषयावर मी काहीही बोलणार नसल्याचे म्हणत राज्यात आरोग्यमंत्री कुणाचे आहेत?, असा खोचक सवाल शिवसेनेला केलाय.
महत्वाच्या बातम्या : –
पंतप्रधान किसान योजनेंतर्गत २० लाख अपात्र लाभार्थ्यांना 1,364 कोटी रुपये दिले: आरटीआय
आंध्र प्रदेशातील टोमॅटोच्या शेतकर्यांचे 2020 मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान
उन्हाळी हंगामासाठी योग्य शिफारशीत भुईमूग जातींची निवड
सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू साथीचा फैलाव; महाराष्ट्रही झाला सतर्क
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 2192 कोटींचा निधी ‘वितरित’; वडेट्टीवार