ढोबळी मिरची लागवड पद्धत
महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा या जिल्हांमध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली जाते. महाराष्ट्रात ढोबळी मिरची पिकत असली तरी रंग हिरवागार असल्यामुळे भाजी शिवाय इतरही उपयोग होतो. ढोबळी मिरचीच्या चवीमधील फरक मुख्यत्वेकरून फळामधील कॅप्सीसीनच्या प्रमाणावर अवलंबून असतो ते साधारणत: 2 ते 4 टक्क्यांपर्यंत असते.
हवामान
ढोबळी मिरचीला दिवसाचे सरासरी तपमान 25 सेल्सिअस व रात्रीचे 14 सेल्सिअस या पिकास उत्तम तापमान असून तापमान 10 सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास पिकाच्या वाढीवर परिणाम होतो.
जमीन व हंगाम
ढोबळया मिरचीची लागवड ऑगस्ट, सप्टेबर महिन्यात करतात. त्यामुळे फळांची काढणी जानेवारी, फेब्रूवारी या कालावधीत करता येते. नदीकाठच्या पोयटयाच्या सुपिक जमिनी लागवडीस योग्य आहेत. जमिनीचा सामु 6 ते 7 च्या दरम्यान असावा.
पूर्वमशागत
ढोबळया मिरचीची लागवड रोपे लावून करतात यासाठी एक किंवा दोन आर क्षेत्रावर रोपवाटीका करावी. जमिन चांगली उभी आडवी नांगरून हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत घालावे. पूर्वीच्या पिकांचे धसकटे गोळा करून दोन कुळवाच्या पाळया द्याव्यात.
वाण
कॅलिफोर्निया वंडर
अर्का मोहिनी
यलो वंडर
बियाण्याचे प्रमाण
दर हेक्टरी 3 किलो बियाणे लागतील. एक किलो बियाण्यास पेरणी करण्यापूर्वी 2 ग्रॅम थायरम चोळावे.
लागवड
रोपे तयार करताना 3द1 मीटर चे गादी वाफे तयार करून त्यात बी पेरावे. वाफ्यातील रोपांना झारीने पाणी दयावे. रोपे 45 दिवसात (06 ते 08 आठवडयानंतर ) पुर्नलागवडीसाठी तयार होतात.पुर्नलागवड करताना 60 सेंमी अंतराने स-या काढाव्यात. रोपी सरीच्या दोन्ही बाजून 30 सें.मी.अंतरावर लावावे व पुर्नलागवड झाल्यावर लगेच पाणी दयावे.
खते व पाणी व्यवस्थापन
हेक्टरी 15 ते 20 टन शेणखता व्यतिरिक्त 150 किलो नत्र 150 किलो स्फूरद व 200 किलो पालाश ची आवश्यकता असते. पैकी पालाश व स्फूरद यांचा पूर्ण हप्ता व नत्राचा अर्धा हप्ता लागवडीच्या वेळी द्यावा. उरलला नत्राचा हप्ता लागवडीनंतर एक महिन्याने व दुसरा हप्ता 50 दिवसांनी द्यावा.
आंतरमशागत
ढोबळी मिरची चुरडा मुरडा या रोगास बळी पवडत असते. त्यासाठी मिरचीचा मळा नेहमी स्वच्छ असणे आवश्यक असते. त्यासाठी सुरुवातीच्या काळास जरूरीप्रमाणे दोन तीन वेळा निंदणी करावी. तसेच झाडांना मातीचा भक्कम आधार द्यावा.
रोग व किड
रोग
मर – या रोगामध्ये शेंडयाखालील भाग वाळत जातो. हा रोग फायटोप्थोरा या अळिंबीच्या प्रकारामुळे होतो.
उपाय – रोगग्रस्त झाडे समुळ नष्ट करावीत व राहिलेल्या झाडांच्या मुळाजवळ 0.6 टक्के तीव्रतेने बोर्डो मिश्रण ओतावे.
बोकडया – हा व्हायरस रोग असून या विषाणूंचा प्रसार माव्याच्या किडीमार्फत रोगट झाडा पासून चांगल्या झाडाकडे होत असतो. या रोगामुळे पाने आखडून झाडांची वाढ खुंटते. झाडांना फूले येत नाहीत. व उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो.
उपाय – रोगग्रस्त झाडे समुळ उपटून नष्ट करावीत. 1 किलो मोनोक्रोटोफॉस प्रति लिटर पाण्यात या प्रमाणात घेऊन झाडांवर दर 15 दिवसांचे अंतराने नेहमी फवारणी करावी.
काढणी व उत्पादन
फळे हिरवीगार व संपूर्ण वाढलेली असल्यास फळांची काढणी करावी. साधारणत: दर आठ दिवसांनी फळांची काढणी करावी. प्रति हेक्टरी 17 ते 20 टन सरासरी उत्पन्न मिळते.