कृषी कायद्यांना जे म्हणतात काळा, त्यांच्या तोंडाला लावा पाहिजे टाळा – रामदास आठवले
केंद्र सरकारने नवीन तीन कृषी कायदे केले ते चांगले आणि शेतकरी हिताचे कायदे आहेत. त्या कायद्यांना विरोध करणे योग्य नसून या कृषी कायद्यांचे स्वागत केले पाहिजे, असेही रामदास आठवले राज्यसभेत म्हणाले. तसेच काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असून, आंदोलन करण्याची काहीच गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नवीन कृषी कायद्यांना जे म्हणतात काळा, त्यांच्या तोंडाला लावा पाहिजे टाळा’, अशा आपल्या खास शैलीत म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शेतकरी आंदोलनाला विरोध केला आहे.
रामदास आठवले म्हणाले की, मी जनगणना ही जाती आधारित करावी अशी मागणी आहे. महाराष्ट्रात मराठा; उत्तर प्रदेशात ठाकूर ;हरियाणा मध्ये जाट आणि राजस्थान मध्ये रजपूत या क्षत्रिय जाती आरक्षणाची मागणी करीत आहे.त्यामुळे देशभरात क्षत्रिय समाजातील गरिबांना वेगळे 10 टक्के आरक्षण देण्यात यावे.
महत्वाच्या बातम्या : –
पुणे ठरले सर्वात थंड शहर, पुढील दोन – तीन दिवस तापमानातील घट कायम राहणार
शेतकरी आंदोलनावर सायना नेहवाल आणि अक्षय कुमारचे ‘कॉपी-पेस्ट’ ट्विट
गुड़मार म्हणजे काय? त्याची लागवड कशी करावी जाणून घ्या
स्टीव्हिया लागवड शेतकर्यांसाठी एक फायदेशीर व्यवसाय