जैविक, नैसर्गिक, सेंद्रिय, विषमुक्त, शेती करण्याचे फायदे व रासायनिक का नको….? ह्याबद्दलची 50 कारणे

0

१) जमिनिचा नैसर्गिकरित्या पोत सुधारतो, उत्पन्न वाढते, खर्च कमी होतो. विषमुक्त अन्न मिळते,ज्यामूळे धोके टळतात,आजारपण कमी येते. मालाला भाव चांगला भेटतो.

२ ) पाण्याची ५० % बचत होते.

३ ) सर्वच प्रकारच्या जीवजंतुंची जमिनीत झपाटयाने वाढ होते.

४ ) जमिनीची सुपीकता वाढते.

५ ) जमिनीचा पोत वाढतो.

६ ) हवेतील ओलावा ओढून घेते.

७ ) नत्र उपलब्ध होते.

८ ) प्रथिनांचे प्रमाणानुसार कुजण्याचा ‘वेग वाढतो.

९ ) जमिनीची सजिवता वाढते.

१० ) पक्व वनस्पती आच्छादनाबरोबर तरूण वनस्पती आच्छादनाचे लवकर विघटन होते.

११ ) जमिनीत संजिवकांची निर्मिती होते.

१२ ) जमिनीत नविन घडण होते.

१४ ) पिकांच्या वाढीला आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.

१५ ) स्थिर कर्ब जमिनीत स्थिरावतो.

१६ ) आंतरकाष्टांगजन्य विघटन.

१७ ) मर प्रतिबंधकता पिकात प्राप्त होते.

१८ ) सर्वच रासायनिक क्रिया -प्रक्रियांचे नियंत्रण होते .

१९ ) जमिनीत वेगाने ह्युमसची निर्मिती होते.

२० ) कर्ब- नत्र गुणोत्तर कमीत कमी होते.

२१ ) एकदल-द्विदल आंतरपिकांचे आच्छादन मायेचा पदर असतो .

२२ ) जमिनीतील बंदिस्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात .

२३ ) मातीची धूप थांबून पाणी जिरते.

२४ ) आच्छादनाने देशी गांडूळे चमत्कार करतात.

२५ ) जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.

२६ ) आंतरपिकांची मुळे कुजवून जमिनीस पहेलवान बनवण्याचे कार्य करते.

२७ ) जमिनीत मुबलक सुर्यशक्ति साठविली जाते.

२८ ) पिकाचा अन्न तयार करण्याचा वेग वाढतो.

२९ ) पिकांत साखरेचे प्रमाण , उत्पादन वाढवते .

३० ) पिक -प्रती- पिक उत्पादन वाढतच राहते.

३१ ) बियाणांची उगवण व वाढीसाठी आवश्यक उष्णतामान मिळवून देते .

३२ ) उन्हाळ्यात व दुष्काळात फळझाडे व पिकांना जिवंत ठेवून जगवते.

३३ ) जिवाणू संख्या वाढतच राहते प्रकर्षाने जाणवणाऱ्या रोगांना आळा बसतो.

३४ ) जलधारणाशक्ती वाढते.

३५ ) जमिनीचा सामू नियंत्रित होतो.

३६ ) खारे पाणी सुसह्य होते.

३७ ) फळझाडांना भरपूर आधारमुळे फुटतात.

३८ ) जमिनीतील व हवेतील उष्णता ह्यांचे मधील परस्पर अदलाबदली रोखली जाते.

३९ ) जमिनीला अतिनील किरणांपासून वाचविते.

४० ) जमिनीत शक्ती संतुलन बनते.

४१ ) जमिनीत जैवगतीशास्त्राला चालना मिळते.

४२ ) वैश्विक किरणांना पकडून फळे व पिकांची प्रत सुधारते.

४३ ) पिकांची व फळांची चव तर वाढतेच शिवाय टिकाऊपणा पण वाढतो .

४४ ) हवेतील आर्द्रता वेळप्रसंगी मुळयांना व जिवाणूंना पुरवली जाते .

४५ ) जमिन क्षारपड होण्यापासुन वाचते.

४६ ) जमिनीवरिल वातावरण खेळते राहते.

४७ ) जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक नियंत्रित होतो.

४८ ) जमिनीचे शुद्धिकरण होऊन पिकांत प्रतिकारशक्ति निर्माण होते .

४९ ) जमिनीत गुरुत्वाकर्षण व केशाकर्षण शक्तींचे संतुलन साधले जाते .

५०) सर्वात महत्वाचे म्हणजे जमिन पूर्वरत स्थितीत राहते.

जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे
 ९४०४०७५६२८

Leave a comment